Ad will apear here
Next
‘ललित २०५’ने गाठला १०० भागांचा टप्पा


मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ललित २०५’ या मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. या प्रसंगी मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी सेटवर हजेरी लावत कलाकारांसोबत आनंद साजरा केला.

‘ललित २०५’ ही मालिका सोमवार ते शनिवारदरम्याने रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यामुळे सेटवर उत्साहाचे वातावरण होते. निर्माता म्हणून सोहम बांदेकरची ही पहिलीच मालिका असल्यामुळे तो खूपच आनंदात होता.



‘ललित २०५ या मालिकेच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकता आल्या. नवी माणसे भेटली. त्यामुळे सर्वांशी कामासोबतच इमोशनल बाँडिंग झाले आहे. यासाठी मी ‘स्टार प्रवाह’चे मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे मला ही  संधी मिळाली,’ अशा भावना निर्माता सोहमने या वेळी व्यक्त केल्या.

‘शंभर भाग ही खरतर सुरुवात आहे. ‘ललित २०५’ मालिकेच्या यापुढील भागांमध्येही नवनवी वळणे येऊन मालिकेचे कथानक अधिक रंजक होणार आहे. त्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरूरुन प्रेम केले असून, यापुढेही करतील,’ असा विश्वास नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने व्यक्त केला.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZLCBU
Similar Posts
‘स्टार प्रवाह’ची नवी मालिका ‘ललित २०५’ मुंबई : कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ‘ललित २०५’ ‘स्टार प्रवाह’ घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका सहा ऑगस्टपासून रात्री ८
‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ मुंबई : नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका सहा ऑस्टपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली आहे. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित...
अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन मुंबई : अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असून, स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांमधील नायिकांनी भरभरून शुभेच्छा देतानाच स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण यांविषयी रोखठोक मते मांडली आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language